महात्‍मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना

महात्‍मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजना.

या विभागाचा प्रमुख हा राज्‍य शासनाचा वर्ग 1 चा अधिकारी असतो. याचे पदनाम उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी दर्जाच्या ,जिल्हा कार्यक्रम समन्वयक(मग्रारोहयो) असते. पचायत विभागामार्फत ग्राम पंचायतचे संपुर्ण नियंत्रण ठेवले जाते. तसेच या विभागामाव्‍दारे केद्र व राज्‍य शासनाच्‍या विविध योजना अतिशय उत्‍कृष्‍ठ प्रकारे प्रसार, प्रशिध्‍दी करून राबविल्‍या जातात. जिल्‍हयात एकुण ८ पंचायत समित्‍यामध्‍ये ५५१ ग्राम पंचायत आहेत. यासाठी 3२२ ग्राम सेवक व 5३ ग्राम विकास अधिकारी व पंचायत समिती स्‍तरावर २५ विस्‍तार अधिकारी(पंचायत) मणूष्‍यबळ उपलब्‍ध आहे.या विभागाचे कामकाज हे मुबंई ग्राम पंचायत अधिनियम 1958 नुसार \चालविण्‍यात येते.या विभागामार्फत माहराष्‍ट्र शासनाचा उपक्रम संपुर्ण स्‍वच्‍छता अभियान राबविण्‍यात येतो.यामध्‍ये शाळा, आंगणवाडीत स्‍वच्‍छतागृह व पिण्‍याचे पाणी इत्‍यादी सुविधा परविण्‍याचे काम केले जाते.यासाठी जिल्‍हास्‍तरावर स्‍वंतत्र कक्ष व आवश्‍यक मणुष्‍यबळ उपलब्‍ध आहे. याच विभागामार्फत केंद्र शासनाचे प्रत्‍येकाला काम या धरतीवर महात्‍मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजना प्रभावी पणे राबविली जाते.या योजनेची 50 टक्‍के कामे ग्राम पंचायत स्‍तरावर व उर्वरीत 50 टक्‍के कामे (ऐजंशी) राज्‍य शासनाच्‍या विविध विभागामार्फत केली जातात.
1) महात्‍मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजना.
2) संत गाडगेबाबा गाम स्‍वच्‍छता अभियान.
3) निर्मल ग्राम पुरस्‍कार.
4) ग्राम पंचायतीची घर कर वसूली.
5) ग्राम पंचायतीची पाणीपटटी कर वसूली.
6) जिल्‍हा ग्राम विकास निधि.
7) जिल्‍हा स्‍तरावर बाजाराचे लिलाव करणे.
8) पंचायत समिती स्‍तरावर मत्‍यपालन तलावाचे लिलाव करण